Skip to main content

बलात्कार अन अत्याचाराचा दहशतवाद

                                        16 डिसेंम्बर 2012 च्या रात्री निर्भया बलात्कार घटनेने संपूर्ण देश ढवळून निघाला.निर्घृणपणे बलात्कार करून खून करण्यात आलेल्या या घटनेविरोधात जागोजागी मोर्चे ,निषेध करण्यात आले .या घटनेचा निकाल लागत नाही तोपर्यंत कोपर्डी येथे 13 जुलै 2016 ला अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केलेली घटना समोर आली.हैदराबाद येथे घडलेल्या बलात्कारी घटनेत आरोपींचे एन्काऊंटर करून बळी पडलेल्या स्त्री ला न्याय मिळवून देण्यासाठी एक पाऊल यंत्रणेने उचललं पण आजही आपल्या देशात बलात्कार आणि अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. याच प्रमुख कारण म्हणजे गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती च राहिलेली नाही.न्यायालयात 20-30 वर्षे प्रलंबित राहिलेले खटले आपल्याला आपल्या देशात स्त्री किती सुरक्षित आहे याची साक्ष देतात. 

यातूनच सुरू झाला तो म्हणजे स्त्री वरील बलात्कार आणि अत्याचाराचा दहशतवाद..!
नुकतेच आंध्र च्या धर्तीवर मंजूर केलेले शक्ती विधेयक बलात्काराचा दहशतवाद रोखण्यासाठी एक ठोस पाऊल ठरते आहे . यामध्ये देण्यात येणाऱ्या मृत्यूदंड शिक्षेमुळे स्त्री वर होणाऱ्या अत्याचारी घटनांवर जबर वचक बसू शकतो ,पण स्त्री सुरक्षिततेसाठी फक्त कायदे करून उपयोगाचे ठरणार नाही तर या कायद्याची भीती समाजामध्ये निर्माण व्हायला हवी तरच माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अत्याचारी घटनामधून स्त्री सुरक्षित राहू शकते.
हुंडाबळी कायदा 1961,कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 या कायद्यानंतरही आजवर कित्येक स्त्रिया अत्याचारी छळाला कंटाळून स्वतःच्या जीवाला मुकल्या आहेत.न्यायालयीन व्यवस्था विधेयकापूर्वीही आपल्या देशात होतीच तरी स्त्री वर होणारा अत्याचार आजवर कोणताच कायदा थांबवू शकला नाही,याउलट राजस्थान मध्ये प्रत्येकी 24 तासात अत्याचाराचे 40 गुन्हे नोंदवले जातात तर बलात्काराच्या गुन्ह्यात तब्बल 37 टक्के पेक्षा जास्त वाढ झालेली आहे .इतकंच नाही ,तर न नोंदवलेले गुन्हे की जे उघडकीस ही येत नाहीत ते वेगळेच! स्त्री ला जर इतकीच भोगाची वस्तू समजली जाते त्या देशात एका कायद्याने स्त्री कशी काय सुरक्षित राहू शकते?
महिलांच्या सुरक्षिततेसाठी विधेयक ,सरकार,न्यायालयीन व्यवस्था फक्त हेच जबाबदार आहेत का ? जर खऱ्या अर्थाने स्त्री ला समाजात सन्मानाच स्थान द्यायचं असेल तर संपूर्ण समाजव्यवस्था ढवळुन निघायला हवी. पुरुषप्रधान संस्कृती आहे म्हणून स्त्री ला दुय्यम स्थान देने या विचारात जखडलेल्या समाजाला आधी मूल्य शिक्षनाचे धडे द्यायला हवेत .गार्गी ,मैत्रेयी,अहिल्याबाई होळकर,राजमाता जिजाऊ या ही स्त्रिया ज्यांनी स्वतःच्या कर्तृतत्वाने इतिहास कोरला हा इतिहास पाठीशी ठेवून आजच्या स्त्रियांनी ही स्वतःमधील क्षमता ओळखायला हव्यात .बऱ्याच दा अत्याचार होणाऱ्या महिला मानहानीला घाबरून आयुष्यभर हा छळ सहन करतात अन शेवटी आत्महत्या करून स्वतःला संपवून टाकतात,त्यामुळे नवे कायदे काटेकोर पणे अंमलात आणून गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसवायचा असेल तर स्त्रियांनीही कोणाच्या अत्याचाराला न जुमानता या कायद्याची मदत घेऊन समाजात निर्भीडपणे वागायला हवं.तरच कायद्याची भीती समाजात निर्माण होईल आणि खऱ्या अर्थाने हे कायदे अमलात आणले जातील.
स्त्रियांवर होणारे बलात्कार हा एक प्रकारचा देशात तयार झालेला दहशतवादच आहे . स्वराज्यातल्या एका स्त्री वर बलात्कार केला म्हणून गुन्हेगाराचे दोन्ही हात पाय कापून त्याचा चौरंगी आकार बनवून भर चौकात ठेवून छत्रपतींनी बलात्काराविरोधी स्वराज्यात ही भीती निर्माण केली होती ,आज ही बलात्कार रोखण्यासाठी अन स्त्री ला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी याच प्रकारची भीती या शक्ती विधेयकाने करणे अपेक्षित आहे. बलात्काराच्या गुन्हेगारांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात येऊन या कायद्याची समाजात भीती निर्माण झाल्याशिवाय स्त्री सुरक्षिततेवर गत्यंतर नाही.

Comments

Popular posts from this blog

Taali

 Taali           खरंच कौतुक करावं वाटत , या series मधल्या प्रत्येक कलाकाराचं आणि सर्वात महत्वाचं ते म्हणजे गौरी सावंत यांची भूमिका केलेल्या सुश्मिता सेन चं ! आपल्यासमोर फक्त टाळ्या वाजवणारे आणि टोल नाक्यांवर ,रेल्वे मध्ये पैसे मागणारे म्हणून ज्यांची प्रतिमा तयार होते त्या व्यक्तीचे वैयक्तिक आयुष्य ,त्याला सोसावी लागणारी स्थित्यंतरे ...खरंच हृदय पिळवटून टाकणारी आहेत . स्त्री आणि पुरुष याच्या ही बाहेर एक नैसर्गिक जीवन आहे पण आपल्यात ते समाजमान्य नाही म्हणून जगण्याचा अधिकार च नाही का? यावरची बरीच उत्तरे 'गौरी सावंत' यांच्या प्रवासातून मिळतात . त्यांचा 'गणेश ते गौरी' हा प्रवास या समुदायाच्या जगण्याविषयी विचार करायला भाग पाडतो .       सिरीज मधले प्रसंग बघून आपल्या आजूबाजूला या घटना होत असतात ,आपण त्याकडे संवेदनशीलतेनेही बघायची तसदी घेत नाही ,त्या किती विक्षिप्त आहेत याची प्रचिती येते. या सिरीज मधला सगळ्यात जास्त टोचलेला प्रसंग तो म्हणजे, नर्गिस ची death आणि त्यानंतर फक्त dead body स्ट्रेचर वर ठेवण्यात यावी या मागणीला असंवेदनशील लोकांनी केलेला विरोध ! हे बघताना खर

तूच तुझी वैरीण

                  आज दुपारी कॉलेज वरून येताना एका ठिकाणी द्राक्षे विकत घ्यायला थांबले. द्राक्षांचा दर उतरत येत असल्याने मी ही पाडून दरात द्राक्षे मागितली .द्राक्षे विकणारी व्यक्ती या एक वयस्कर आजीबाई होत्या .उन्हाची धाप लागून त्यांना चक्कर येत होती.मी माझ्या बॅगेतली पाण्याची बाटली काढून त्यांना दिली.भर उन्हात सहन होत नसतानाही हे काम का करताय असा सहानुभूती पूर्वक प्रश्न त्यांना मी केला . "बाई पोटासाठी झिजावं लागतंय" अस त्या उत्तरल्या. कष्ट केल्याशिवाय तर आयुष्याला पर्याय नाही ,रोजीरोटीसाठी काम करणं हाच संसाराचा राहाटगाडगा यामध्ये नवल नाही पण, "आजी इतकं वय झालेलं असताना ,शरीराला झेपत नसताना का राबताय?" म्हणून विचारलं त्यावर त्या म्हणाल्या "जगत आहे तोपर्यंत माणसाने कामात गुंतवून घेतलं पाहिजे ,आमचे मालक पोरग लहान असतानाच वारले ,एकट्या पोराला घेऊन आज इथवर आले ,इकडं तिकड काम करून त्याच शिक्षण अन लग्न करून दिल,त्याच्या जबाबदारी तुन निवांत झाले पण जगण्यासाठी दोन पैसे घरात आणले पाहिजेत,मी नाही कमवल तर सून घरात आयत देणार नाही .या वयात बाहेरची परवड होणार नाही ग,त्यापेक्षा

थरार

                   नेहमीसारखाच आजही व्यायामशाळेतून यायला उशीर झाला होता .व्यायामशाळेत जाण्यासाठी आम्हाला रोज परळीचा घाट पार करून सातारला जावं लागतं ,अंतर तस फार नाही अकरा किलोमीटर आहे पण रस्ता मात्र घाटाचा अन डोंगररांगांनी वेढलेला ! रात्री अपरात्रीच्या वेळी मुलीनी इतका वेळ घराबाहेर थांबू नये म्हणून घरची मंडळी सतत ओरडतात, पण निशु ताई अन मी काही आमच्या व्यायामाच्या वेळेत हयगय करत नाही. आमच्या ठरलेल्या वेळेत च म्हणजे साडे नऊ च्या दरम्यान घरी येतो . आजही सगळा व्यायाम उरकून , आरशात बघत शरीरयष्टी चे भारदस्त फोटो काढले. फ्रेश होऊन गाडीला किक मारली अन घरी यायला निघालो. व्यायामाने थकलेल्या शरीराला खूप भूक लागली होती , घरी लवकर पोहोचून गरमागरम ताटावर ठाण मांडायला मिळावं म्हणून गाडीचा वेग मी वाढवला होता . सुनसान अशा त्या आडबाजूच्या घाट रस्त्याला गाड्यांची वर्दळ फार नव्हती पण अंधारलेल्या समयी रातकिड्यांच्या कीर्र आवाजात भीतीदायक माहोल तयार झाला होता .वाटेत लागणाऱ्या उरमोडीच्या पुलाशेजारीच गावची स्मशानभूमी आहे .त्या पुलावरून जाताना एका सालात एक तरी बळी 'ती' घेतेच अश