16 डिसेंम्बर 2012 च्या रात्री निर्भया बलात्कार घटनेने संपूर्ण देश ढवळून निघाला.निर्घृणपणे बलात्कार करून खून करण्यात आलेल्या या घटनेविरोधात जागोजागी मोर्चे ,निषेध करण्यात आले .या घटनेचा निकाल लागत नाही तोपर्यंत कोपर्डी येथे 13 जुलै 2016 ला अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केलेली घटना समोर आली.हैदराबाद येथे घडलेल्या बलात्कारी घटनेत आरोपींचे एन्काऊंटर करून बळी पडलेल्या स्त्री ला न्याय मिळवून देण्यासाठी एक पाऊल यंत्रणेने उचललं पण आजही आपल्या देशात बलात्कार आणि अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. याच प्रमुख कारण म्हणजे गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती च राहिलेली नाही.न्यायालयात 20-30 वर्षे प्रलंबित राहिलेले खटले आपल्याला आपल्या देशात स्त्री किती सुरक्षित आहे याची साक्ष देतात. यातूनच सुरू झाला तो म्हणजे स्त्री वरील बलात्कार आणि अत्याचाराचा दहशतवाद..! नुकतेच आंध्र च्या धर्तीवर मंजूर केलेले शक्ती विधेयक बलात्काराचा दहशतवाद रोखण्यासाठी एक ठोस पाऊल ठरते आहे . यामध्ये देण्यात येणाऱ्या मृत्यूदंड शिक्षेमुळे स्त्री वर होणाऱ्